सांगली : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार मधले तणावपूर्ण संबंध सगळ्या राज्याने पहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी मिश्किल भाष्य करत, उत्तराखंडमध्ये परत जाण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली, यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य्क्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. आता हे सूचक विधान होते की यामागे अर्थ काढण्यासारखे काहीच नव्हते, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
साकीनाका प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे – चंद्रकांत पाटील
उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा बेबी राणी मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले. याचा आणि राज्यातील अतिवृष्टीचा संदर्भ घेऊन, “नेहमी अतिवृष्टी-पूर अशी संकटं असलेल्या भागातून मी आलोय. पण मी राज्यपाल म्हणून इथे आल्यापासून इथेही पाऊस सुरू झाला आहे. आता जंयत पाटील यांना वटत असेल कि माझ्यामुळे हे होत आहे, तर मी हे सोडून निघून जाईल. हो ना जंयत साहेब?” असं ते म्हणाले.
मन सुन्न! नराधमांना फाशीच झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, या वक्तव्यानंतर कोश्यारी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी, ‘त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण ते पुन्हा सक्रिय होतील कि नाही माहीत नाही. मात्र वयाच्या ७५ वर्षांनंतर भापजत नेते निवडणुकीत सक्रिय नसतात,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते नेते कोण? सोमवारी फुटणार राजकीय बॉम्ब
- राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात रस्सीखेच, ‘या’ नेत्यांची नावे आघाडीवर
- भर बैठकीत शिवसेना आमदार छगन भुजबळांवर भिडला; पालकमंत्री आणि सुहास कांदेमध्ये जोरदार खडाजंगी
- बलात्कार पीडीतेच्या मृत्यूनंतर नीलम गोऱ्हेना आली जाग; महिलांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्राला पाठवले पत्र
- ‘लाज वाटते मला यशोमती ठाकूर यांची,’ हे तुमचं नेतृत्व?’- भाजप