मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज दुसऱ्यांदा सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार असून त्यांचा आज शेवटचा युक्तिवाद असणार आहे. त्यामुळे ते नेमकी काय युक्तिवाद मांडणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. तर आज राज्यपालाचे वकिल तुषार मेहता यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला.
हेही वाचा…“मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे?” संपाबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांची बाजू वकिल तुषार मेहता यांनी मांडली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपालांना दिलेली वस्तुनिष्ठ सामग्री आहे. राज्यपाल दहावी अनुसूची आणि त्यामुळे निर्माण होणार्या परिणामांशी संबंध नाही. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्यास सांगण्याऐवजी अविश्वास प्रस्ताव आणण्याची आवश्यकता होती? राज्यपालांना फ्लोअर बोलावण्याचा अधिकार सरकार स्थापन होण्यापुर्वीच असतो. शिवराजसिंह चौहान केसमध्ये आले आहे. तो चांगला कायदा आहे. राज्यपालांनी पक्षाच्या प्रमुखांना नाही तर एकनाथ शिंदे यांना का आमंत्रित केले. असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केलेल्या संपात तांबे पित्रा-पुत्राचा सहभाग , जनतेचे प्रचंड हाल
त्याचबरोबर २५ जून रोजी शिवसेनेचे ३८ आमदार, २ प्रहार आणि ७ अपक्ष अशा एकूण ४७ जणांनी राज्यपालांना पत्र लिहून सांगितले की त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे आणि संजय राऊत यांची व्हिडीओ क्लिप दाखविली, त्यात राऊत म्हणाताहे की, ते महाराष्ट्रात जिवंत परतणार नाहीत. असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केलं. त्यावर कोर्टाने महत्वाची टिप्पणी करण्यात आली आहे.
हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
दरम्यान, राज्यपालांनी बहुमत बोलवण्याचं कारण हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं. तसेच जीवाला धोका आहे म्हणून बहुमत चाचणी घेण्यासाठी बोलवणं योग्य नाही. अशी महत्वाची टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य हे एक सुसंस्कृत राज्य आहे. मात्र अशा घटनांमुळे याला कलंक लागतो. राज्यपालांचं असं करणं हे लोकशाहीसाठी खुपच घातक आहे. राज्यपालांना सुरक्षाबाबत पत्र पाठवणं पुरेसं होतं. पंरतु त्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवणं योग्य नाही. असंही कोर्टाने म्हटलं आहे. तीन वर्षाचा सुखी संसार राज्यपालांनी कसा मोडला? अशी टिप्पणीही केली
Read also
- हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
- हेही वाचा.“भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागलेत”, राष्ट्रवादीची भाजपवर टिका
- हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत
- हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पवारांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, भाजपने केला मोठा गट काबीज
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर