मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्या उपस्थित करत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शविला. त्यानंतर राज ठाकरे यांच्य आव्हांना राज्यातील काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरावर मोठ्या प्रमाणात आवाज देऊन हनुमान चालिसा वाजवण्यात आली. मात्र पुण्यात याचा उलट परिणाम दिसला मिळालं. राज ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. तर अशातच आता पुण्यात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्य़ावरून मनसे पुणे शहरात खळखट्यात करणार असल्याचं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी सांगितलं आहे.
आयएनएस विक्रांतचा ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? सोमय्यांकडे बोट दाखवत राऊतांचा सवाल
पुण्यात मशिदीवरील भोंग्यांवरून मनसेत वसंत मोरे आणि हेमंत संभूस असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी जोर धरू लागल्या आहेत. पुण्यातील डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसे पोलिस ठाण्यात पत्र दिले आहेत. त्यांनी डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशन ला याबाबत पत्र दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना भोंगे काढण्य़ाचा 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर भोंगे काढले नाहीतर त्याच्या दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचं हेमंत संभुस यांनी म्हटलं आहे.
एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की..; वसंत मोरेंची मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेट
आमच्या पक्षाची कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायची इच्छा नाही. अथवा प्रार्थनेला विरोध नाही. तरी अनधिकृत भोंग्यामुळे सर्व सामान्य नागरीक वृद्ध व विद्यार्थी यांना होणार त्रास मनसे खपवून घेणार नाही. त्यामुळे शहरातील अनधिकृत भोंगे काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची तसेच पोलीस प्रशासनाची आहे. तसे न झाल्यास मशिदीसमोर दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठन केले जाईल, असं पत्र मनसेतर्फे पोलिसांना देण्यात आलं आहे.
राज ठाकरेंचा आदेश हा अंतिम; वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर मनसेत दोन प्रवाह
दरम्यान, आजच मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर शहर मनसेत पक्षाध्यक्षांच्या आदेशावरूनच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण राज्याचे सरचिटणीस आणि माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पक्षात राजसाहेबांचा आदेश अंतिम असून वयक्तिक भूमिकेला थारा नाही. असं ठणकावून सांगितलं आहे. पक्षाची भूमिका राजसाहेबांनी शिवतीर्थावरून मांडली आहे शहराध्यक्षची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही असं शिंदे म्हणाले आहेत.
Read also:
- इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच केली कारवाई; मनसेची राऊतांवर खोचक टीका
- दिल्लीत शरद पवार, मोदींची भेट! इडीच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग
- गिरीश महाजन जिलेबी, संजय राऊत सुरी तर किरीट सोमय्या भोंगा; पेडणेकारांची जोरदार फटकेबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा..! उच्च न्यायालयाने दिले १५ एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश
- आयएनएस विक्रांत प्रकरण! किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना आव्हान