पुणे : देशातील सर्वात मोठा वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसह भागीदारी केली असून या माध्यामातून महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेल्याने काॅंग्रेस नेते सतेश पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणावरून भाजप आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळत आहे.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
महाराष्ट्रात होणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीची संयुक्त भागीदारी असलेला 1 लाख 58 हजार कोटींचा देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर उत्पादनाचा प्रकल्प सध्याच्या ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला आहे. वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारी असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण होता. असं सतेश पाटील यांनी म्हटलं आहे.
“जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
पुढे बोलताना ते म्हणाले की, हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये करण्याबाबत जवळपास निश्चित झाले असताना आणि याबाबत सर्व स्तरावर चर्चा झाली असताना अचानक हा प्रकल्प गुजरातला जाणे अत्यंत धक्कादायक आहे. भविष्याच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी असून महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने आज केले आहे.
“पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
वेदांत प्रकल्प हा एक लाख कोटी रूपयांची गुंतवणुक असलेले डिस्ले फॅब्रिकेशन, 63 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचे समीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रूपयांचा चाचणी प्रकल्प आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.
Read also
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
- “आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप