नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील सत्ता संघर्षावर निर्णय दिल्यानंतर आता गेल्या १० महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांची यादी तयार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीवारी केल्याने केंद्रातून मंत्रीपदाच्या यादीला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…“मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही”
महाविकास आघाडी पायउतार होऊन सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारची पुढील महिन्यात वर्षपूर्ती होणार आहे. मात्र अद्याप देखील दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार देखील जवळपास महिना-दीड महिन्याने झाला होता. दरम्यान आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.
हेही वाचा…“आर्यनचा आंतरात्मा .., प्लीज.. मी तुम्हाला बाप म्हणून.. “, आर्यन खानसाठी शाहरूख हातापाया पडला, वाचा सविस्तर…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री अचानक दिल्ली वारी केली. यामध्ये केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्रीपदांच्या यादीवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. विस्तारित मंत्रिमंडळामध्ये तरुण आमदारांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये चांगली प्रतिमा असणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. विधान परिषदेतील १-२ आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार आमच्या संपर्कात, निवडणुकीआधी….” भाजप मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा…“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”, नोटबंदीवरून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात
हेही वाचा…“अंधेरी रात में गया, और अंधेरी रात में वापस आया,” फडणवीसांची ‘दिल्ली’ वारी’ चर्चेत ?
हेही वाचा…काॅंग्रेसचा नागपुरचा ‘वजीर’ भाजपमध्ये जाणार ? फडणवीसांनीच लावली फिल्डिंग , एकेकाळी त्यांनाच दिली होती टक्कर
हेही वाचा…“कर्नाटक हल्ल्याचा इतका राग? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट”, नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा मोदींना टोला