दिल्ली : पहिल्या लाटेत देशात अनेक लोकांचे जीव गेले. त्यावेळेस या अचानक उद्भवलेल्या संकटाचा सामना कसा करावा, काय उपाययोजना कराव्यात, याची काहीच माहिती/कल्पना नसल्याने, झालेले मृत्यू हे नैसर्गिक होते. मात्र, यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत महामारीचा कहर उभ्या देशाने पाहिला. यात महामारीने झालेले मृत्यू तर होतेच, पण यावेळी देशात ऑक्सिजन अभावी, योग्य वेळेत आवश्यक ते उपचार न मिळाल्याने देखील अनेक मृत्यू झाले.
केंद्र सरकारला धक्का; सहकाराचा विषय राज्यांचाच – सुप्रीम कोर्ट
दरम्यान, दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली, त्यावरून संपूर्ण देशात संतापाचे आणि नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. यावरून विरोधकांनी देखील सरकाराला धारेवर धरले असून, प्रचंड हाहाकारानंतर आता जेव्हा देशातील दुसरी लाट ओसरली आहे. तेव्हा, ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचे लेखी उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. यामुळे आता नवा वादंग उभा राहिला आहे.
मोदी-शहांवर सामनातून टीका: पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर
सरकारच्या या उत्तरावर आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना, “केंद्र सरकार लेखी उत्तरात म्हणतं, ऑक्सिजन अभावी देशातील नागरिकांचे मृत्यू झाले नाहीत? हे तुम्हाला पटतं का? खऱ्यापासून हे सरकार दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं आहे. देशातल्या ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी या सरकारवर न्यायालयात खटलाच दाखल केला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
नव्याने सामाविस्ट २३ गावांच्या बाबत, आघाडी सरकारचा भाजपला दे धक्का!
“ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी इकडे-तिकडे हिंडत होते, त्यांचा यावर विश्वास बसतोय का? उत्तर लेखी असेल किंवा तोंडी असेल, पण सत्य परिस्थितीपासून सरकार दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. काल पंतप्रधान वाराणासीत होते. त्यावेळी, सर्व काही आलबेल असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु बाजूनेच वाहणाऱ्या गंगेतून सर्वात जास्त प्रेतं वाहत होती. त्यांनी सांगावं गंगा खोटे बोलते का?,” असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला आहे.
Read Also :
- ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही, आता भाजपने बोलावं – विजय वडेट्टीवार
- नरेंद्र मोदी आहेत, तो पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता – रामदास आठवले
- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती, ‘फ्रेश’ चेहऱ्यांणा मिळणार संधी
- भाजपला धक्का: ‘हा’ माजी आमदार बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ
- डान्सबार सुरू मात्र देवदैवत कुलुपात बंदिस्त, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड