औरंगाबाद : ज्यसभेच्या रिक्त जागांवर आता महाराष्ट्रा सह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश अशा एकूण सहा जागांवर पोटनिवडणूका होणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी यासंबंधीची मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे, राज्यात या मानाने का होईना, निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील एकमेव जागेसाठी काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरु आहे.
राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, कोण घेणार सातव यांची जागा?
राज्यातील काँग्रेस दिग्गज नेते खासदार राजीव सातव यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळं निधन झालं. त्यामुळे, राज्यसभेतील सदस्यत्व कुणाला मिळणार, याकडे काँग्रेसमधील नेते मंडळींचं जास्त असून, त्यासाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग देखील सुरु केलं आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या सर्वाधिक प्रबळ उमेदवार मानल्या जात असल्या तरी मुकूल वासनिक, अविनाश पांडे, मिलिंद देवरा आणि संजय निरुपम हे देखील इच्छुक असल्याने, प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
दरम्यान, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की त्यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांत खलबतं सुरु असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासून प्रज्ञा सातव यांच्या नावाचीच चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे, आता हायकमांड कोणाच्या पारड्यात वजन टाकणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
Read Also :
- ‘लाज वाटते मला यशोमती ठाकूर यांची,’ हे तुमचं नेतृत्व?
- मन सुन्न! नराधमांना फाशीच झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
- “साकीनाका प्रकरणात एकच आरोपी आहे, दुर्दैवाने महिलेचा जबाब नोंदवता आला नाही”- हेमंत नगराळे
- साकीनाका प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे – चंद्रकांत पाटील
- साकीनाका बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश