मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचा आरोप केला. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंच्या आरोपाचं समर्थन करताना देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची घणाघाती टीका केली.
“मुख्यमंत्री मरू द्या”, वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा अखेर माफीनामा
संदीप देशपांडे म्हणाले, “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले २० वर्षे बघत आहे. राष्ट्रवादीनं जे केलं ते राज ठाकरे बोलले आहेत, यात चुकीचं काही नाही.”
१२ सदस्यांच्या यादीवर राज्यपालांनी अजित पवारांचा काढला चिमटा; काँग्रेस नेत्याला खडेबोल सुनावले
यावेळी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसेच या पुढील भूमिका राज ठाकरे ठरवणार असल्याचंही स्पष्ट केलं. “लोकलबाबत निर्णय झाला, पण अनेकांना पास मिळत नाहीत. दुसरा डोस अनेकांना मिळाला नाही. फक्त पास नको, तिकीट पण द्या. मुंबईत लस केंद्रं बंद ठेवली आहेत”, असेही त्यांनी सांगितले.
Read Also :
- पुणे शहराला खड्ड्यात घालवून भाजपची खोटी बॅनरबाजी; राष्ट्रवादी स्पर्धेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणार
- प्रशासकीय यंत्रणांनी दबावाखाली भेट टाळली, पालघर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री भारती पवारांचा आरोप
- “जेवणाला बोलावलं मात्र हात बांधलेले, ही शुद्ध फसवणूक; आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका
- “…तेव्हा मी त्यांना उत्तरे देईन,” भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खासदार भावना गवळींचे किरीट सोमैयांना आव्हान
- लायकीत राहा! नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करून टाकू, मनसेचा प्रवीण गायकवाडांना इशारा