पुणे : मराठा आरक्षाणा पाठोपाठ राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाला देखील सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आज ओबीसी नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती.
दरम्यान, यावेळी या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, ‘येत्या २६ आणि २७ जूनला लोणावळ्याला २५० लोकांचे शिबीर घेण्यात येईल से सांगितले. तसेच, या शिबीरात ३ सत्रात या प्रश्नावर चर्चा होईल आणि पुढील वाटचाल ठरवली जाईल,’ असे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी, ‘आम्ही ओबीसी आरक्षणाबद्दल पंतप्रधानांना निवेदन दिले आहे. हा आरक्षणाचा विषय फक्त राज्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण देशाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे, आम्ही मुख्यमंत्र्यांना जातनिहाय जनगणना करायला हवी, अशी विनंती केली आहे. तसेच पुढील चर्चेवेळी राज्यातील सर्व पक्षातील नेत्यांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
तसेच, ‘राज्यातील ओबीसी समाज एक होत आहे याचा मला अभिमान आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या, समजाच्या किंवा संघटनेच्या विरोधात नाही,’ असे सांगत त्यांनी, ‘मी मंत्री असलो तरी माझीही मागणी हीच आहे की, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, तरच ओबीसींचे प्रश्न सुटतील,’ असं मत त्यांनी मांडलं आहे.
Read Also :
- कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, संतप्त शिवसेना आमदाराचे प्रताप
- अभय बंग महान सामाजिक नेते, त्यांच्यामुळेच राज्य व्यसनमुक्त झाले; वडेट्टीवारांचा टोमणा
- राजकारण नव्हे; शिवसेनेची विचारधाराच चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर
- जे नक्षलवाद्यांना कळलं ते सरकारला का कळत नाही ? – विनायक मेटे
- मराठा आरक्षणासाठी दिल्ली दरबारी मोर्चा काढावा? संजय राऊत म्हणतात….