मुंबई : आणिबाणी काळात शाळेत असताना आजूबाजूच्या राजकीय घडामोडींनी उत्सुकता वाढवली आणि त्याला वर्तमानपत्रांनी खतपाणी घातलं. त्याच वयात कुठेतरी पत्रकारितेमध्ये करियर करावं असं ठरवलं. त्यावेळी माझ्यासमोर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक गोविंदराव तळवळकर आणि गवा बेहेरे हे दोन आदर्श होते. तळवळकरांचे अग्रलेख मी रोज वाचायचो. या दोघांच्याही लेखणीतील तिखटपणा हा समान धागा होता. तळवळकरांचे लेखन शेवटपर्यंत वाचलं. त्यामुळे पत्रकारीतेत रस वाटू लागला. मात्र सांगलीतील आटपाडी या मूळ गावानं मला घडवलं, अशा भावना एबीपी माझेचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांनी व्यक्त केल्या. एबीपी माझाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचे खासदार तथा दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी माझा कट्यावर खांडेकरांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हे पण वाचा, शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा; चंद्रकांतदादांचा राऊतांना सल्ला
‘माझा’च्या बातमीत लोकांना विश्वासार्हता वाटते, हेच यश असल्याची भावना यावेळी मुख्य संपादक राजीव खांडेकरांनी व्यक्त केली. पहिली बायलाईन आली त्यावेळी काय भावना होती असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावेळी राजीव खांडेकर म्हणाले की, “माझी पहिली बायलाईन बातमी ही दलित मुलांच्या त्याच्या शिष्यवृत्तीसंबंधी होती. त्यावेळी समाजकल्याण खात्यात मोठा भ्रष्टाचार झालेला होता. त्या पहिल्या बायलाईचा मोठा आनंद झाला होता”, असे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा, राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
प्रत्येक घटना काहीतरी शिकवते. काही जणांनी कसं वागायचे तर काही जणांनी कसं वागायचं नाही असं ठरवलं. ई-टीव्हीत काम केल्यानंतर पुन्हा लोकसत्तामध्ये काम केलं. तिथं वेगवेगळे प्रयोग केले. त्यानंतर लोकसत्ता सोडून त्यावेळचे ‘स्टार माझा’ या ठिकाणी संपादक म्हणून जबाबदारी घेतली असं आपल्या पत्रकारीतेतील वाटचालीबद्दल सांगताना राजीव खांडेकर म्हणाले.
हे पण वाचा, “स्वबळाची भाषा करण्याआधी एकदा पायाखालची जमीन तपासून घ्या”- संजय राऊत
वाहिनी सुरु करतानाचा प्रवास उलघडून सांगताना राजीव खांडेकर म्हणाले की, “वाहिनी सुरु करताना तरुण मुलांना घेऊनच सुरु करायचं असं धोरण होतं. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या पलिकडे जाऊन महाराष्ट्रातील तरुणाची टीम तयार केली. कारण ग्रामीण भागातील तरुणांना एकाच वेळी अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे अनेक गोष्टींचं त्यांना भान असतं. सर्व क्षेत्रातील तोंडओळख असायला हवी ही माध्यमांत काम करणाऱ्या लोकांची गरज असते आणि ग्रामीण भागातील तरुण ती नेमकेपणाने भागवतात.”
हे पण वाचा, शिव प्रसाद काय असतो .. ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा..
वृत्तवाहिनीच्या संपादकाला स्वत: राजकीय मत असावं का असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर राजीव खांडेकर म्हणाले की, “प्रत्येक संपादकाला आपली स्वत: ची भूमिका असलीच पाहिजे. पण ती भूमिका अग्रलेखातून व्यक्त व्हावी, बातमीतून नाही. बातमी ही बातमीच असावी. वाहिनीमध्ये रिपोर्टरला भूमिका असू नये, त्याने तटस्थपणे बातमी द्यावी. वाहिनीची भूमिका ही सत्यासाठी असावी. हे करताना माझी वैयक्तिक भूमिका काही असेल तर ती व्यासपीठावरुन मांडेन. वाहिनीचा विचार हा जनतेचं हित हाच असायला हवा, त्याने लोकांशी आपली बांधिलकी ठेवायला हवी”, असे खांडेकरांनी सांगितले.
Read Also :
- निवडणुकीत पत्ता कट केलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन
- “कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एकतर्फी होणार”, डॉ. अतुल भोसलेंची वाळव्यात गर्जना
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
- संघ भाजपच्या बैठका; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भाजप आमदाराची नाराजी
- बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याचा शिवसेनेला त्रास !