पुणे – आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा समितीला घेऊन त्यांनी दिल्ली गाठली आणि बैलगाडा शर्यतीसाठी पाठपुरावा केला. बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. मात्र तुम्हाला शब्द देतो की, आम्ही सर्व जीवाची शर्त लावू परंतु यापुढे बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही. त्याकरीता जे काही करता येईल ते आम्ही करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत महेश लांडगे यांनी पुण्यातील वळगाव-चिखली याठिकाणी आयोजित केली आहे. बैलगाडा शर्यत बघण्यासाठी असंख्य बैलगाडा हौशे उपस्थित आहेत. मागील पाच दिवसापासून ही बैलगाडा शर्यत सुरू असून जवळपास 2 कोटी रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आले आहे. आज त्याचा शेवटचा दिवस असून याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की याठिकाणी येताना अनेकांनी विचारलं की, महेश दादा लांडगे आणि तुम्ही सारखचे ड्रेस घातले आहेत. त्यावेळी त्यांना सांगितलं की बैल काही एकटा येत नाही. जोडीने येतो. ते पण नांगरसकट. असं वक्तव्य करताच उपस्थितीत लोकांनी जोरदार जल्लोष केला.
“राजघराण्यातील व्यक्तींनी संजय राऊतांसारख्या फडतूस माणसाला बोलण्याची संधी देऊ नये!”
बैलगाडा शर्यतीसाठी आपण 2014 साली कायदा केला होता. परंतु पुन्हा तो कार्टात गेला. त्यावेळी न्यायालयाने सांगितल की बैल हा पळणारा प्राणी नाही. त्यानंतर याबद्दल अहवाल तयार केला, तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर त्यांनी मान्य केलं की बैल हा पळणारा प्राणी आहे. त्यानंतर बैलगाडा शर्यत सुरू झाली. मात्र यापुढेही बैलगाडा सुरू राहणार असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणताच नेता समोर येत नव्हता. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी खूप काही केलं. त्यांनी त्यावेळी केल नसतं तर आज बैलगाडा शर्यत सुरू झाली नसती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी झटणारा देवेंद्र फडणवीस हा मी पहिलाच नेता पाहिला आहे. त्यांच्यामुळेच आज बैलगाडा शर्यत सुरू आहे, असं मत महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
Read also:
- राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
- “तुमच्या आमदाराने याठिकाणी खुप चांगलं काम केलंय”; शरद पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक
- राजकारणात हातखंड असणाऱ्या वडिलांच्या छत्रछायेत वाढलेल्या राजकीय लेकींची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा पूर्ण होईल का?
- “चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार
- मुंबई वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी वॉर्ड गमवला, भाजपला फायदा