दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने, ओबीसी समाजाचं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, ओबीसी आरक्षणाला घेऊन सध्या राज्यात प्रचंड गदारोळ सुरु आहे. यातच, आता निवडणूक आयोगाने राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही नेते आणि भाजप नेत्यांनी निवडणूका रद्द करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात, यासंदर्भातील एक याचिका दाखल करण्यात आली असून, त्यात ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम ६ महिने पुढे ढकलण्याची किंवा इम्पेरिकल डाटा मिळेपर्यंत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून, यावर आता पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस व अमित शहांची भेट म्हणजे २०२४ची रणनीती; रावसाहेब दानवेंनी सांगितले रहस्य
राज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदूरबार या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने तिसरी लाट आणि डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण या पार्श्वभूमीवर, या पोटनिवडणुका ६ महिने लाबंणीवर टाकण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्याआधी राज्य सरकारने, या निवडणूका पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याने पोटनिवडणुका लांबणीवर टाकता येणार नाहीत, असं निवडणूक आयोगाने सरकारला कळवलं होतं. त्यानंतर ही याचिका राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यातली होती.
नाना पटोलेंच्या पत्रावर नितीन राऊतांकडून मोठा खुलासा, म्हणाले…
या निवडणुकांसंदर्भात, २९ जून-५ जुलै कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार असून, त्यांची छाननी ६ जुलैला होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे ९ जुलैपर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी १२ जुलै, तर अपील असलेल्या ठिकाणी १४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १९ जुलैला स. ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होईल. २० जुलैला मतमोजणी होईल, असं निवडणूक आयुक्त श्री. मदान यांनी सांगितले आहे.
Read Also :
- “कोणी कितीही आपटली, तरी अध्यक्षपदी महाविकास आघाडीचाच उमेदवार येणार”
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
- जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने; ED चौकशीवरून रंगली जुगलबंदी