मुंबई: भाजप नेते महाविकास आघाडीत कधी बिघाड होणार यांची वाट बघत आहे. तसेच भाजपकडून सरकार पाडण्यासाठी शर्तीचे पर्यंन सुद्धा चालू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर वाद होईल आणि सरकार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. पण, ‘अशा चर्चा पसवल्या जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुख पत्र असलेले सामनातून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा खुलासा सुद्धा केला. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदाबाबात अडीच-अडीच वर्षे ठरलेच नव्हते, मुख्यमंत्रीपद हे पाच वर्षे शिवसेने कडेच राहील, असं ठामपणे सांगितलं आहे.
‘अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’ असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
…आम्हाला सरकार पाडण्यात काही रस नाही
‘देवेंद्र फडणवीस सांगतात, ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्याच वेळी चंद्रकांत पाटील ठामपणे सांगतात, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल. कोणाला कळणार नाही. भाजपचे धोरण स्पष्ट दिसत नाही. सरकारचे काय करायचे ते फडणवीस व पाटील यांनी एकाच टेबलावर बसून काय ते ठरवायला हवे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही हे अमित शहा यांनी एकदा स्पष्ट केले. परिस्थिती अद्यापि तीच आहे’ असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.