नवी दिल्ली : शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी राज्यपालांच्या संदर्भाने गंभीर आणि खळबळजनक असं विधान केलं आहे. सध्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा परत डोके वर काढत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी, “राज्यपाल नियमबाह्य काम करतात. त्यांच्यामुळे, राष्ट्राला आणि संविधानाला धोका आहे. त्यांची राष्ट्रपतींनी चौकशी करावी,” अशी मागणी केली आहे. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना असं विधान केलं.
भुजबळांच्या ‘त्या’ इमारतीचे खरे मालक सांगा! मुख्यमंत्री आणि शरद पवारांना सोमैय्यांचे चॅलेंज
यावेळी त्यांनी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना हे बोलावच लागेल. मी विरोधी पक्षनेता आहे हे सांगावच लागतं,” असा टोला त्यांनी लगावला आहे, तर मंदिरे उघडण्याचा मुद्द्यावरूनही त्यांनी आपले मत व्यक्त केलं. “मंदिरे आणि शाळा उद्यापासून उघडाव्यात असं अगदी मलाही वाटतं. पण मंदिरे जाणीवपूर्वक बंद ठेवलेली नाहीत. सगळ्यांची आर्थिक कोंडी होत आहे, हे मान्यच आहे. पण महामारीला थांबवण्यासाठी हे गरजेचं आहे,” असं ते म्हणाले.
महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी? दिलीप मोहिते-पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर
दरम्यान, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांच्यात चालू झालेला संघर्ष कदाचित आज थांबण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णयाप्रत येण्यासाठी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मविआच्या नेत्यांना भेटीची वेळ दिली आहे. त्यानुसार आज संध्याकाळी सात वाजता ही भेट होणार आहे.
“…तर देशात लसीकरण शक्य नसतं आणि देश कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेला असता” – फडणवीस
मागील आठवड्यात राज्यपालांच्या भेटीवरुन हाय व्होल्टेज नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते २६ ऑगस्टला राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, ही भेट अचानक रद्द झाली. कारण या भेटीबाबत दुपारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना माहितीच नसल्याने भेटीबाबत सरकारमधेच समन्वयाचा अभाव दिसून आला होता.
Read Also :
- राणे-सेना वादानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप!
- “…तर ५ सप्टेंबरला जलसमाधी घेऊ,” राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; पंचगंगा परिक्रमा सुरू
- मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया
- अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…
- मविआ नेते राज्यपालांना भेटणार? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता!