मुंबई : राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष हा संपता संपेना झाला आहे. राज्यपाल हे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कित्येक मागण्यांवर थेट पाणी सोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर मग संघर्षाला तोंड फुटते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी यावरूनच राज्यपालांना एक खरमरीत पत्र लिहलं होतं.
भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील होणाऱ्या संघर्षांवरून न्यायालायने देखील नाराजी व्यक्त केली होती. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रस्तावावरून पुन्हा एकदा राज्यपालांविरोधात महाविकास आघाडी सरकारचा संघर्ष वाढेल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परत पाठविल्याने ही निवडणूक आता लांबणीवर पडणार आहे. राज्यपाल महोदय जो पर्यंत या निवडणुकीला मंजुरी देत नाही तोपर्यंत अध्यक्षपद कोणालाही दिले जाणार नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून विधानसभेचे अध्यक्षपद हे रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांकडे सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र, अजूनपर्यंत त्यांच्याकडून निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकलेली नाही.
मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीऐवजी हात वर करून आवाजी पद्धतीने घेण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून याबाबतची तारीख देण्याची मागणी केली , मात्र तो प्रस्ताव आता राज्यपालांनी परत पाठवल्याने राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
Read also:
- “एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी द्या! सरकार कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो”
- शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य
- गावसकर, सचिन विराटसारखे दिग्गज संन्यास घेतात; मग काॅंग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का नाही?
- महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए
- ” दरेकरांनी त्यांचं नाव बदलून दरोडेखोर ठेवावं”; नाना पटोलेंची दरेकरांवर जहरी टीका