सध्या राज्याचे नेतृत्व कोणाच्या हातात आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मात्र सध्या राज्याचे खरे कॅप्टन कोण आहेत, सरकार कोण सांभाळत आहे राज्याच्या तमाम जनतेला माहित आहे. शरद पवार हेच खरे कॅप्टन आहेत, तर मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसलेले आहेत, त्यांना शरद पवार हेच मार्गदर्शन करतात, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहबे दानवे यांनी केले.
यावेळी दानवे म्हणाले की, राज्याचे स्टेअरिंग कधी याच्या तर कधी त्याच्या हातात असते. गाडी एक आणि ड्रायव्हर दोन अशी काहीशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. असा चिमटाही दानवे यांनी यावेळी काढला.
आयोध्येतील राम मंदिराचे भुमीपूजन ऑनलाईन पद्धतीने व्हावे असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला कोरोना जाऊ दे हे साकडे घालून आल्यावर आता सल्ला देता का? असा टोला लगावला.