मुंबई – महाराष्ट्रात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यात देखील कमालीचा संघर्ष, आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आरोप प्रत्यारोपांची मालिका इतकी पुढे गेली आहे की अक्षरशः कोर्टाला मध्यस्ती करावी लागली आहे आणि आणखी काही दिवसांसाठी नवाब मालिकांचे सोशल मीडिया वापरणे काहीसे बंद करा असा आदेशही देण्यात आला आहे.
हे सर्व सुरु असताना आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले.
राज्यात ठाकरे, पवार यांनी एकत्र यावं ही तर बाळासाहेबांची इच्छा; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
नवाब मालिकांच्या या आरोपावर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी सणसणीत टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर एक ट्विट केले आहे.
भंगार मलिक स्वतःला फार महत्त्वाचा माणूस समजायला लागला आहे. त्याच्यावर पाळत ठेवूण्या इतकं महत्त्व मलिकाचं नाही. चार दिवस टीव्हीवर दिसला म्हणून कोण लोकप्रिय होत नाही, माझं आजही म्हणणं आहे जी मलिकने भूमिका घेतली ती ड्रग माफियांना फायद्याची ठरली हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 27, 2021
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की पाळत ठेवण्याइतपत नवाब मालिकांचं महत्व नक्कीच नाही. चार दिवस एखादा माणूस टीव्हीवर दिला म्हणजे तो लोकप्रिय होतो असं अजिबात होत नाही. तसेच नवाब मलिकांनी घेतलेली भूमिका, ही ड्रग माफियांना नक्कीच फायद्याची ठरली, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, अशी टीका देखील निलेश राणे यांनी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न ‘या’ ठिकाणी नाहीच; लंके विरुद्ध औटी यांच्यात होणार प्रतिष्ठेची लढाई
एवढंच नाही तर मलिकांना राणे यांनी भंगार असं संबोधलं आहे. ” भंगार मलिक स्वतःला फार महत्त्वाचा माणूस समजायला लागला आहे. त्याच्यावर पाळत ठेवूण्या इतकं महत्त्व मलिकाचं नाही. चार दिवस टीव्हीवर दिसला म्हणून कोण लोकप्रिय होत नाही, माझं आजही म्हणणं आहे जी मलिकने भूमिका घेतली ती ड्रग माफियांना फायद्याची ठरली हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटनंतर आता मलिक विरुद्ध राणे असा वाद देखील पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता नवाब मलिक हे राणेंना काय उत्तर देतात हे बघणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
Read Also :
- मार्च एप्रिलमध्ये भाजप-शिवसेनेचे राज्यात सरकार स्थापन होईल – रामदास आठवले
- एसटी संप फुटला आहे या निव्वळ अफवाच; संजय राऊत, शरद पवारांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल
- संप मागे घेतला तरच एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार; अनिल परबांचा कामगारांना इशारा
- संपाचा हट्ट जर कायम असेल तर नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी – संजय राऊत
- एसटी संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी; जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट