नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून, संसदेचं कामकाज एकही दिवस सुरळीत झालं नाहीये. विरोधकांनी पेगॅसस आणि तीन कृषी कायद्यांसह, इतर मुद्द्यांवरुन सभागृहात गोंधळ घालत सरकारला धारेवर धरले. दरम्यान काल १२७ वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर, इन्शुरन्स बिल मांडायला संसदेत सुरवात झाली आणि विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून त्याचे तुकडे सगळीकडे फेकले. एकच गदारोळ उडाला आणि राज्यसभेत मार्शलला पाचारण करण्यात आले.
यावरून, आता विरोधकांनी सरकराल धारेवर धरले असून, त्यांनी आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि संसदेपर्यंत मोर्चा काढला. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “या इन्शुरन्स बिलला आमचा विरोध आहे. हा खासगीकरणाचा प्रयत्न आहे. पण काल आम्हाला असे वाटले जसे हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर आम्ही उभे आहोत आणि फक्त बंदुकीच आणण्याचे शिल्लक होते,” असा घणाघात त्यांनी केला.
The Opposition is united. On 20th August, Congress interim president Sonia Gandhi will speak to CMs of Congress-ruled states. Maharashtra CM Uddhav Thackeray will also take part in this meeting: Shiv Sena leader Sanjay Raut
— ANI (@ANI) August 12, 2021
तसेच, “सदन व्यवस्थित चालवणे ही जबाबदारी सरकारची आहे. आता मार्शलना बोलावणे ही काही नवीन गोष्ट नाही, पण आमच्यासमोर महिला कमांडो उभ्या केल्या गेल्या, अशी कोणती मर्दुमकी तुम्हाला दाखवायची आहे?” असा आरोप देखील त्यांनी केला. दुसरीकडे दोन्ही सभागृहात झालेल्या या अभूतपूर्व अशा गोंधळानंतर लोकसभा व राज्यसभा बुधवारी स्थगित करण्यात आली. त्यामुळे दोन्ही सभागृहाच्या सभापतींनी दु:ख व्यक्त केले.
महापालिका रणधुमाळी: सत्ताधारी भाजपचे कमळ पाण्यात बुडणार? २०२२ वाजणार घड्याळाची टिक-टिक!
यानंतर आता, आज विरोधी पक्षांची बैठक होणार असून, या बैठकीला शरद पवार सहभागी होणार आहेत. तसेच, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी २० ऑगस्टला काँग्रेसशासित, तसेच भाजपविरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून, दूर दृश्य प्रणालीद्वारे संपन्न होणाऱ्या या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सामील असणार आहेत. त्यामुळे, या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळासोबतच संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
The opposition didn't get a chance to present their views in Parliament. Yesterday's incident against women MPs was against democracy. It felt like we were standing at the Pakistan border: Sanjay Raut, leader, Shiv Sena pic.twitter.com/MZYeQ1Qju9
— ANI (@ANI) August 12, 2021
Read Also :
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे
- कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
- “मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
- अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान