मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांपूर्वी पंजाबच्या दौऱ्यावर होते. पंजबामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक चांगलीच राजकीय वातावरण पेटवणारी ठरली आहे. आम आदमी पक्ष, अकाली दल, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या पक्षांमध्ये मुख्य लढत पंजाब विधानसभेसाठी होणार आहे.
देशाचे पंतप्रधान पंजाबमध्ये सभा घेण्यासाठी जाणार होते आणि त्यांच्या जाण्याच्या मार्गावरच नेमके आंदोलन सुरु करण्यात आले. पंतप्रधानांचा दौरा म्हणजे एक सुनियोजित दौरा असतो आणि त्यासाठी एक विशेष पुस्तिका तयार केलेली असते. त्याचे काही नियम असतात. या नियमांअंतर्गत पंतप्रधानांचा दौरा असताना त्यांचा मार्ग हा मोकळा केलेला असतो. असं असताना मोर्चाला कशी परवानगी दिली गेली ? आणि पोलीस प्रशासन काय करत होते ? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतं आहे. यावरून महाराष्ट्रात देखील बरेच आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले.
“खरंतर भाजपने माझ्या घरच्यांची माफी मागायला हवी..”; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर जोरदार टीका
यावरून शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेत होणाऱ्या त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे असं देखील संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Read also:
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दलचा गाफीलपणा हा एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
- “एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जातोय”; पंजाबच्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचं मोठं विधान
- “सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत, आंदोलनाच्या नावावर त्यांनी वर्गणी गोळा केली”
- “पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?”
- पोलिसांनाही आता ‘वर्क फॉर्म होम’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय