पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाची परीक्षा आज (२४ ऑक्टोबर) ला होत आहे. मात्र आजही परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. पुणे, नाशिक मधील काही परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचा गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले असता काही ठिकाणी पेपर देण्यास उशीर झाला, 11 वाजून गेले तरी परीक्षार्थींना पेपरच मिळाले नव्हते, तर काही ठिकाणी आसन व्यवस्थेवरुन परीक्षार्थींचा गोंधळ उडाला.
वाटोळ करायचं अन् मी नाही… मी नाही… काही केलं म्हणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे; उदयनराजे संतापले
आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाला आहे. या गोंधळामध्ये जेवढा वेळ उशीर झाला तेवढा वेळ परीक्षार्थींना वाढवून मिळणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? गोपीचंद पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल
पुण्यातील आझम कॅम्पस, नाशिकमधील गिरणारे येथील केबीएच हायस्कुल परीक्षा केंद्रासह राज्यातील इतर परीक्षा केंद्रावरही हा गोंधळ उडाला होता. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक न आल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते. राज्यातील खेड्यापाड्यातून हे परीक्षार्थी परीक्षा द्यायला आले आहेत. मात्र आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळं अनेक परीक्षार्थींना अश्रू अनावर झाले.
शिवसेनेच्या बॅनरवरुन चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब; संजय राऊतांचा मात्र भला मोठा फोटो
सिंधुदुर्ग, बीड, लातूर, सोलापूर मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी आले आहेत. ‘दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी तीन- चार हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो, पण यावेळीही निराशाच पदरी पडल्याचं,’ ते म्हणाले. आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये दोन सत्रात पेपर असल्याने परीक्षार्थींना सकाळी एका जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र दिले आहे.
तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील
सकाळचा पेपर कोल्हापूरला अन् दुपारी औरंगाबादला… जायचं कसं? परीक्षाचं योग्य नियोजन करता येत नसेल तर परीक्षार्थींना तुमचं हेलिकॉप्टर द्या, परीक्षा झाली की परत करतील, अशा संतप्त प्रतिक्रिया परीक्षार्थींनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. आरोग्य विभागातील सावळा गोंधळ काही संपता संपत नाही, आता एकच विनंती युवकांना सांगून टाका आम्ही गुणवत्तेनुसार निवड करणार नसून ठराविक रकमेवर निवड करणार !किमान युवकांचा अभ्यासात वेळ तरी वाया जाणार नाही.पर्यायी मार्ग शोधतील, अशी संतप्त प्रतिक्रीया परीक्षार्थींंना सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे.
Read Also :
- औरंगाबादच नाव बदलण्याची आमच्यात हिंमत आहे, तुम्ही मैदानात या, दाखवतो – चंद्रकांत खैरे
- माझ्या मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे – संजयकाका पाटील
- शाहरुख खाननं भाजपात प्रवेश केला तर कोकेन नव्हे, पीठ सापडलं म्हणून सांगतील – छगन भुजबळ
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला हारवणे शक्य नाही, म्हणून खुद्द शरद पवार रणांगणात – चंद्रकांत पाटील
- मोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण; आईंचीही टेस्ट आली पॉझिटिव्ह