मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. सत्तासंघर्षानंतर आता निवडणुकांमध्ये लोक कुणाच्या बाजूने उभी राहणार, त्यासाठी ठाकरे आणि शिंदे आपल्या जाहीर सभांमधून लोकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच खासदार संजय राऊतांनी केलेल्या टिकेला आता शिंदे गटाकडूनही उत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा….इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक
खेड, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या सभांमधून जनता कुणासोबत आहे. ते निवडणुकीतून स्पष्ट होईल. असं राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर आपणा सर्वांना माहितीय की शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो, ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसतं. म्हणूनच संजय राऊतांनी असं काहीतरी बोलणं हे हास्यास्पद आहे. असं रामदास कदमांनी म्हटलं आहे.
हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
त्यावर आमची सभा बाळासाहेबांच्या विचारांची असणार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवण्यासाठी जे जे सांगितलं, केलं आणि पथ्य पाळली, ती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाळणार आहे. पाच तारखेला एक लाख लोकं होती, हे ठाकरे गटाचे नेते कमी आणि राष्ट्रवादीवाले जास्त सांगत आहेत. त्यामुळे ठाकरे गटापेक्षा राष्ट्रवादीचे लोक जास्त प्रवक्ते झाले असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला.
Read also
- हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात
- हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल
- हेही वाचा…“गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो ?” एकनाथ शिंदेंच्या सभेवर दानवेंची तिखट प्रतिक्रिया
- हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा
- हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत