पुणे : राज्यातील २२ जिल्ह्यांत राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले. तसेच, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणच्या स्थानिक आपत्ती प्रशासनानेही शहरातील निर्बंध शिथिल केले. दरम्यान, पुण्यातील निर्बंधांबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, “पुण्यातील व्यापाऱ्यांना निर्बंधांतून शिथिलता हवी असेल, तर महापालिकेकडून राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवावा, मुख्यमंत्री नक्की विचार करतील,” असं विधान केलं.
मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार
यावर आता पुणे महापौरांनी संतापून ही प्रतिक्रिया दिली असून, “मुंबई आणि बाकी जिल्ह्यांत शिथिलता देताना, त्यांच्याकडून कोणते प्रस्ताव घेतले होते? प्रस्ताव मागवून शिथिलता द्यायची, अशी प्रक्रिया राज्यात कधीपासून सुरू करण्यात आली? एकीकडे आढावा बैठकीत पुण्याचे पालकमंत्री निर्बंध शिथिल करण्याबाबत सकारात्मकता दाखवतात, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री वेगळेच आदेश देतात,” अशी टीका केली आहे.
‘नॉट रिचेबल’ देशमुखांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीची छापेमारी
दुसरीकडे याच प्रश्नावर पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील, “मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव मुंबई महानगर पालिकेकडून मागविण्यात आला होता का? पुणे महापालिकेला इतकी सापत्न वागणूक का? प्रस्ताव पाठवावा म्हणजे आम्ही आमच्या न्यायासाठी ‘अर्ज’ करायचा का? जर आम्ही प्रस्ताव पाठवलाच तर उद्धव ठाकरे आरोग्यमंत्र्यांचे ऐकतील का? असे सवाल उपस्थित केले होते.
पुणे मेट्रो : भाजप-राष्ट्रवादीची श्रेयवादाची लढाई सुरुच, मेट्रोच्या कामाची उद्या फडणवीस करणार पाहणी
त्यामुळे, पुण्यातील निर्बंधांवरून राज्य सरकार आणि पुणे महापौर, तसेच पुणे भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सध्या राज्यातील ११ जिल्ह्यांतच लेव्हल ३ चे निर्बंध लागू आहेत. मात्र मागील १ महिन्यांपासून पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने ४ टक्क्यांच्या खाली असताना, जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता दिली गेली नसल्याने, मुंबई-पुणे ,मध्ये सारखीच आकडेवारी असताना पुण्याबाबतीत हा दुजाभाव का? असा सवाल विचारला जात आहे.
Read Also :
- मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
- “अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या”, नामकरणाच्या वादावरून काँग्रेसची आक्रमक मागणी
- “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात