मुंबई – राज्यातील घडामोडी पाहता राज्य सरकारने केवळ चार चे पाच दिवसांचे विधीमंडळाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर च्या 22,23,24 आणि 27, 28 या पाच दिवशी अधिवेशन होणार आहे. मात्र या अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते बोलत होते. ” राज्य सरकारने केवळ चार-पाच दिवसांचे अधिवेशन बोलवले आहेत. यातला एक दिवस शोकसभेत निघून जातो. म्हणजेच हे यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ चार दिवसांचे होणार आहे. यावरुन राज्य सरकारची अधिवेशनाबाबत बोटचेपी भूमिका दिसून येत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.
नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल; प्रविण दरेकरांचा टोला
“गेल्या दोन वर्षांत अनेक अतारांकित प्रश्न आहेत. अतारांकित प्रश्नांना उत्तरे द्यायला सरकारकडे वेळ नाही. अतारांकित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अधिवेशन लागत नाही. दोन वर्षांत बीएसीत हा अतारांकित प्रश्नांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र कोणत्याही अतारांकित प्रश्नांना, लक्षवेधी प्रश्नांना उत्तरे देण्यात आली नाहीत, यावर मी प्रचंड नाराजी व्यक्त केली. यावर प्रलंबित अतारांकित प्रश्नांची उत्तरे अधिवेशनाच्या आधी देऊ, असं राज्य सरकारने आश्वासित केलं असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
त्याचबरोबर, यंदाच्या अधिवेशनात किमान लक्षवेधी तरी लावण्याची विनंती केली. यावरही राज्यसरकारने दररोज लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरे घेण्याचं आश्वासन राज्यसरकारने दिलं आहे. पण एकूणच पाहता राज्यसरकारची अधिवेशनासंबंधीची राज्यसरकारची भूमिका बोटचेपी असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारला कोणत्याही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत. अशी टीकाही फडणवीसांनी केली.
नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता; महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? अजित पवार म्हणाले…
यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरातच व्हावे अशी आम्ही आग्रही मागणी केली होती. पण राज्यसरकार कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्याचं जाणीवपूर्वक टाळत आहे. विदर्भातील लोकांना त्यांची फसवणूक झाल्याचं वाटत आहे. मुख्यमंत्र्याना नागपुरात अधिवेशन घेता येत नसेल तर मार्चचे अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत विचारणा केली. यावर बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ,असंही सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे संसदीय कामकाजात सरकारला रस नाही. जनतेमध्ये याचा रोष आहे. असही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
डिसेंबर महिन्याच्या 22,23,24 आणि 27, 28 या पाच दिवशी अधिवेशन होणार आहे. पण हे अधिवेशन अजून काही दिवस वाढवू शकतो का, यावर 23 डिसेंबरला अधिवेशन दरम्यान बैठक होणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
Read Also :
- लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका
- “जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी का?”
- …आणि अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर !
- ‘केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा’; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- ‘१ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?’; राजेश टोपे म्हणाले…