अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केला, त्यावेळी राज्यमंत्री पद असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू देखील गुवाहाटीला गेले. त्यानंतर सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं गेलं. त्यातच शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडूंना स्थान न दिल्याने त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करून दाखविली. मात्र शिंदे सरकारने बच्चू कडू यांनी पाठपुरावा केलेल्या दिव्यांग मंत्रालयाला मंजूरी दिल्याने ते आनंदी झाले. यातच आता बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल
मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले, वेळातच भेटायचं असं होता कामा नये. एक तर राजा व्हायचंच नाही झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राज्याचं राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिलं, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे लगावला.
तसेच जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती, तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते, सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती, पण, मी राज्यातील पहिला माणुस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितलं. असं देखील बच्चू कडू यांनी आवर्जून सांगितलं.
Read also
- “वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”
- “कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन
- ‘आप युवा संवाद’ मेळावा खेड आळंदी मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा: मयुर दौंडकर
- “गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप
- “शेजारच्या मंत्र्यांनी दम दिला, लगेच दौरे रद्द..! इतकी लाचारी का आणि कोणासाठी?” राष्ट्रवादीचा सवाल