दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला आहे. या प्रकरणाची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, माजी गृहमंत्र्यांवरच्या या आरोपानंतर परमबीर सिंग यांच्यावरच थेट पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे, तसेच, बुकी सोनू जलानने भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागले.
यांनतर परमबीर सिंग यांनी, उच्च न्यालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी आपल्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या चौकश्या महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांकडून करण्याची मागणी न्यायालयात याचिका दाखल करून केली होती. मात्र, न्यायमूर्ती सरन व न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठासमोर होणाऱ्या या सुनावणीतून न्या. गवई यांनी अंग काढून घेतले आणि सुनावणी पुढे ढकलली गेली.
दरम्यान, आज या याचिकेवर गवई यांचा समावेश नसलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार देत, ‘इतकी वर्षे तुम्ही पोलिस दलात काम करत आहात आणि आता तुम्हाला राज्याबाहेर तुमची चौकशी हवी आहे, असे होणार नाही. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात, तुम्हाला आपल्याच राज्याच्या कारभारावर विश्वास हवा, “ज्यांचे घर काचेचे असते ते दुसऱ्यांवर दगड फेकत नाही,” असं महत्वाचं निरीक्षण नोंदवत ही याचिका फेटाळली आहे.
त्यामुळे आता न्यायालयाच्या या निर्णयाने राज्य सरकाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता परमबीर सिंग यांची चौकशी राज्यातील यंत्रणाच करणार आहे.
Read Also :
- नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
- ‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात टाळाटाळ केली तर मराठा समाजाचं नुकसान’ – चंद्रकांत पाटील
- ‘योगी-मोदी हा वाद केवळ केंद्राचे अपयश झाकण्यासाठीच’ – नवाब मलिक
- शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण
- निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का शरद पवारांच्या भेटीला