मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची काळ सांगता झाली. पहिल्या दिवसापासून पेटलेले अधिवेशन शेवटपर्यंत काही विझले नाही. एकमेकांविषयी कमालीची आक्रमक भूमिका यावेळेस विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने घेतली. विद्यापीठ सुधारणा कायद्यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लबोल चढवला आहे. अधिवेशनाच्या सांगतेनंतर फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’; शिवसेनेच्या मोर्चात नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या लोकशाहीतील सर्वात काळा दिवस आहे. ठाकरे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि पळपुट सरकार आहे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर अकॅडमिक चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेत ही चर्चा थांबवून चर्चेविनाच विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप सरकारने केलं आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी…
सरकारने आणलेल्या नव्या विद्यापीठ कायद्यावरून राज्य सरकारला या कायद्यांचा आधार घेऊन विद्यापीठांना नवीन शासकीय महामंडळ बनवायचे आहे असंच दिसत आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही कायद्यात मंत्र्यांना विद्यापीठांच्या प्रशासकीय कामात ढवळाढवळ करू देण्यारी तरतुद नव्हती. २०१६च्या कायद्याप्रमाणे विद्यापीठांना राजकीय हस्तक्षेपांपासून दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र आताच्या उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्र्यांनी कुलपतींचे सर्व अधिकार हे स्वतःकडे घेतले आहेत. महाराष्ट्रातील विद्यापीठे यापुढे राजकारणाचा अड्डा बनणार आहेत आणि सरकारच्या हाताचं बाहुलं होणार असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.
Read also:
- यंदाच्या हिवाळी अधिवेशनात २४ महत्वाची विधेयके मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
- ज्या गोपीनाथरावांनी तुम्हाला सत्तेत बसवले, तुम्ही त्यांच्याच मुलीला घरी बसवले – आमदार दिलीप मोहिते
- नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ? कालच्या सत्रात न्यायालायने अंतरिम जामिनाची मागणी फेटाळली
- “मला आत्महत्या कराविशी वाटते”… आणि शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराला विधानसभेतच रडू कोसळले.
- “मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का?”, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा शब्द मुख्यामंत्र्यांनी फोल ठरवला?