मुंबई : जगात, देशात आणि राज्यात जवळपास दोन वर्षांपासून महामारीने उच्छाद मांडला आहे. यामुळे सर्व व्यवहार ऑनलाईन झाले असून, अनेक महिने संपूर्ण जगात आणि देशात, तसेच त्यांनंतरही राज्यात लॉकडाऊन आणि त्याच्या निर्बंधात बदल करत राहून, तो सुरूच ठेवल्याने, सर्व काही ऑनलाईन करण्याचाच पर्याय सर्वांसमोर उपलब्ध होता.
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर
या पार्श्वभूमीवर शिक्षण देखील ऑनलाईन झालं आणि याचा फायदा, तसेच फटका शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला. महामारी सुरु झाल्यापासून सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था जवळपास बंद आहेत. त्यामुळे, ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असला, तरी त्यालाही अनेक मर्यादा आहेत. या शिक्षणाचा विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या मानसिकतेवर ताण आला आहे, हा विचार करून अभ्यासक्रमात यंदाही २५ % कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती देताना, “सर्व विचारविनिमय करून आणि महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिने मागच्या वर्षीप्रमाणे याही शैक्षणिक वर्षात इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण तर होईलच, तसेच विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता येतील,” अशी माहिती त्यांनी सांगितली आहे.
कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती @scertmaha लवकरच जाहीर करेल.@bb_thorat pic.twitter.com/d7Z0peFSTi
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 23, 2021
Read Also :
- महाराष्ट्र संकटात, राज ठाकरेंची मनसैनिकांना साद!
- रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
- जयंत पाटलांचं सांगलीकरांना कळकळीचं आवाहन! मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन तातडीने स्थलांतरीत व्हा!
- मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून दिले, डोंगरउतारांवरील वस्त्यांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश
- रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता