कोल्हापुर : राज्यात मागील काही वर्षापासून सत्ताधारी पक्षांविरोधात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करण्यात येत आहेत. यातच भाजप आणि राज्यपालांविरोधात कोल्हापुरात एक अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. वाचाळवीरांना बुद्धी यावी यासाठी आंदोलन करीत असल्याची टिका शिवसेनेने केली आहे.
शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी अलिकडील काही काळात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यातच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यावरून सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत.
“आमच्याकडे एक सुशी ताई, पण वरच्या मजल्यावर घनदाट अंधार”; मनसेची खोचक टिका
यातच कोल्हापुरमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेने जागरण गोंधळ आंदोलन केलं आहे. वाचाळवीरांना बुद्धी यावी यासाठी आम्ही जागरण गोंधळ आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया आंदोलक कार्यकर्त्यांनी दिली आहे. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.
Read also
- “कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन
- ‘आप युवा संवाद’ मेळावा खेड आळंदी मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा: मयुर दौंडकर
- “गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप
- “शेजारच्या मंत्र्यांनी दम दिला, लगेच दौरे रद्द..! इतकी लाचारी का आणि कोणासाठी?” राष्ट्रवादीचा सवाल
- “मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल