अमरावती: अमरावती जिल्हात सर्वांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून बाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच जिल्हात परिस्थीत पूर्व पदावर हळूहळू येत आहे. यामध्ये आणखी घट झाली की, अजून निर्बध शिथिल करण्यात येतील. जनेतेनी सुद्धा काही गोष्टी व नियम पाळण्याची गरज आहे. पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. बाजारपेठा पूर्ण वेळ सुरू होऊन जनजीवन पूर्वपदावर यावे असाच शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे यापुढेही साथ नियंत्रणासाठी व्यापारी बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मर्चंटस चेंबर ऑफ अमरावती या संस्थेचे साथ नियंत्रणासाठी सुरुवातीपासून मोलाचे सहकार्य मिळाले आहे. अमरावतीत साथ कमी होत आहे. त्यामुळे संचारबंदीत काहीशी शिथिलता आणली. यापुढेही असेच सहकार्य ठेवावे जेणेकरून इतरही निर्बंध काढून जनजीवन सुरळीत होईल. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरण कार्यक्रमालाही गती देण्यात येत आहे.
जैन म्हणाले की, अनेक ग्राहकांशी सतत संपर्कामुळे व्यापाऱ्यांना संसर्गाची जास्त जोखीम असते. हे लक्षात घेऊन शिबीर घेण्यात आले. आवश्यकता भासल्यास आणखी शिबीर घेण्यात येईल. सर्व व्यापारी बांधवांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. संचारबंदीचे काही निर्बंध काढून व्यापाराला चालना दिल्याबद्दल संघटनेतर्फे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले.