जळगांव : भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर थेट टीका केली आहे. स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलचे नेते समजत होते, तर निवडणुकीत का पडले याचे आत्मपरीक्षण खडसेंनी करावे, असे म्हणत महाजन यांनी खडसेंवर निशाणा केला आहे. ईडीच्या मुद्यावर बोलतानाही महाजन यांनी खडसेंना चिमटा घेतला. ते म्हणाले की, तुम्ही काहीही केलेले नाही तर ईडीच्या चौकशीला सामोरे जावे. ईडी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यात काहीही तथ्य नसेल तर तुम्हाला ईडी वाजत गाजत परत पाठवेल, असेही गिरीश महाजन यांनी म्हटलं.
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसाना जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी ठाकरे सरकारकडून क्लीन चीट
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जळगावात भाजपचा 1 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात धडक मोर्चा काढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, आर्यन खान व समीर वानखेडे प्रकरण, नवाब मलिकांचे आरोप अशा विषयांवर गिरीश महाजन यांनी टीका केली.
समीर वानखेडेच्या जातीचा दाखला खोटा ठरल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार – नवाब मलिक
ड्रग्ज प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की, राज्यात सर्वसामान्य जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना अख्खे मंत्रिमंडळ एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ताकद लावतेय, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले. दरन्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपचा घात केल्याचीही गिरीश महाजन यांनी टीका केली. विधानसभेत जसा दगा दिला तसाच प्रकार जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपसोबत घडल्याचेही त्यांनी सांगितले.
Read Also :
- देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही – संजय राऊत
- समीर वानखेडे मुस्लीमच आहे, त्याचे वडीलही मुस्लीम; पहिलं लग्न लावून देणाऱ्या कांझी चाच्याचा खळबळजनक दावा
- भाजपला धक्यावर धक्के; उल्हासनगरमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही; संभाजीराजेंचा सरकारला इशारा
- बिघडलेल्या बबड्यासारखी भाजपची अवस्था झाली, नेते खिशात आगपेटी घेवून फिरतायं – निलम गोऱ्हे