अमरावती : नाना पटोले सध्या महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि रुग्णालयांना भेट देण्यासाठी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी २०२४ मध्ये महाविकास आघाडी एक होऊन लढणार आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सत्तेत असणाऱ्या आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनीदेखील शरद पवारांनी आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असं जाहीररीत्या सांगितलं. मात्र, दुसरीकडे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावच लढणार असल्याचे सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना परत एकदा काँग्रेसची भूमिका व्यस्थितपणे उलगडून सांगितली. ‘आम्ही आत्तापासूनच आगामी निवडणुकांबद्दल असणारं आमचं धोरण जाहीर केलं आहे. त्यामुळे, समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी मात्र स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होणार नाही. त्यामुळेच आम्ही सातत्याने म्हणतोय, “आम्ही स्वतंत्रच लढणार”.
Read Also :
- स्वतःचं अपयश झाकण्यासाठी, “आलं अंगावर की, ढकललं केंद्रावर!”; प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘आगामी महापालिका, झेडपी, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूकही आम्ही स्वबळावर जिंकू’
- आमचा विश्वास लोकशाहीवर, राहुल गांधीच बनणार पंतप्रधान – नाना पटोले
- चंद्रकांतदादाना काय झालंय माहित नाही; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंची भूमिका योग्य
- पवार, चव्हाण आम्हाला महत्वाचे नाहीत; पंतप्रधानांशी काय चर्चा झाली नीट जाहीर करावं; मेटेचा मुख्यमंत्र्यांना सवाल