मुंबई : काँगेस पक्षामधील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा समोर आले असून, नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते व माजी आमदार अशिष देशमुख यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांना मंत्री पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी, महापारेषण कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी बीकेसीतील कार्यालयासमोर आंदोलन केलं.
‘या’ महिन्यात राज्यात येणार सर्वात धोकादायक तिसरी लाट, राजेश टोपे म्हणाले…
यावेळी त्यांनी, “नितीन राऊत यांचे निर्णय त्यांचाच विभाग आणि प्रशासन मानत नाही. प्रशासन इतकं उद्दाम असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होणार असतील. तर ते आम्ही होऊ देणार नाही. त्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमच्याच मंत्र्याचा राजीनामा मागू. आम्हाला मंत्र्याच्या राजीनाम्यापेक्षा कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे त्यांना आंदोलन त्यांना इशारा आहे,” टीका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर केली आहे.
“पारनेरच्या तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो…”, अण्णा हजारेंचा ज्योती देवरेंना सल्ला
दुसरीकडे नितीन राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाढती दरीही आता लपून रहिलेली नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद समोर येत असताना, आता काँग्रेस मधीलही वाद समोर येताना दिसत आहेत. दरम्यान, मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि जनसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
Read Also :
- “१२ कोटी जनतेला विचारा उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?” बावनकुळेंचे ठाकरे सरकारला आव्हान
- देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई
- महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस
- “भुजबळ संपल्यात जमा; मुख्यमंत्र्यांना कायमचंच घरी बसवू,” नारायण राणेंचा हल्लाबोल
- छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट