मुंबई : शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्वात जास्त महामारीने बाधित असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी भ्रमणध्वनी (फोन) द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र महामारीशी देत असलेल्या लढ्याचे कौतुक केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज आणि प्रसार माध्यमांच्या द्वारे जनतेला सांगितले.
दुसरीकडे, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईतील महामारीने झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची खरी आणि नेमकी आकडेवारी समोर येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारात तडजोडी करत महामारीच्या संसर्गाचा दर कमी होत आहे, असे आभासी चित्र उभे करणे आणि यामुळे प्रत्यक्ष आकडेवारी आणि स्थिती लक्षात न आल्याने, महामारीशी लढण्यात अडथळे येत आहेत, असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले.
@Dev_Fadnavis जी, आजच मा. @PMOindia यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल.
आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? https://t.co/kpIk2341Tf— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 8, 2021
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी फडणवीसांच्या यासंबंधीच्या ट्विटला रिट्विट करत, ‘देवेंद्र फडणवीसजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड 19 चा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल, आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही? असा सणसणीत टोला लगावला आहे.
Read Also :
- प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक, उजनीच्या पाण्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना अजून एक पत्र लिहून केली महत्वाची मागणी, म्हणाले…
- मराठा आरक्षणासाठी पाऊल पडणार पुढे? आघाडी सरकार “हा” मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता शासकीय सेवेतील पदोन्नती होणार अशाप्रकारे…