मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजप नेते जितेन गजरिया विरोधात मुंबई आणि पुणे पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे. काल मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने त्यांची आठतास चौकशी केली होती. त्यानंतर गजरिया यांनी लिखित माफी मागितली आहे. यावरुन भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारसह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
सदाभाऊ खोत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्रात विचार स्वातंत्र्य आहे की नाही ? जराशी टीका केली सरकारवर तर लोकांना लगेच जेल चा रास्ता दाखवतात.. का ? अग्रलेखातून रोज गरळ ओकणाऱ्या संपादकांना रोज अटक का होत नाही मग ?
तसेच विनाकारण रस्त्याने चालताना दिसला तर त्या व्यक्तीला थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल. याशिवाय मास्कशिवाय कोणी थुंकताना दिसल्यास त्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे निर्बंध ठाकरे सरकारने लावले आहे. यावरूनही खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं
‘हे म्हणजे असे झाले आहे की, नेमेचि येतो कोरोना, जाचक नियमाखाली कुणी का मरेना! कोरोनासंदर्भात अटी व नियम हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे असावेत. पण चुकीचे निर्णय घेण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. कधी तरी जनतेवर भार टाकण्याआधी संवेदशीलतेने विचार करा,’ असे सदाभाऊ खोत म्हणाले आहे.
Read also:
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचा सत्तारूढ गटाला धक्का; आमदार प्रकाश आवाडेंचा पराभव
- काँग्रेसने कमरेखालचे वार करणं सोडून द्याव; पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून विक्रांत पाटील कडाडले
- सत्तार-दानवेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण; सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते संभ्रमात का?
- मोदींच्या पुण्याईमुळे निवडून येतात म्हणणाऱ्या भुजबळांवर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
- सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन नाही, रुग्ण वाढले तर कठोर पावलं उचलू – महापौर किशोरी पेडणेकर