भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याजिल्ह्यातून दौरे सुरु केले आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून कुठे बाहेर पडत नाही या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी एका दगडात दोन पक्षी मारत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला.
चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली. हिंमत असेल तर त्यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी, मुलाखत घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.
सरकार जाणार नाही, हे वक्तव्य कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठीच करत आहेत. अधिकाऱ्यांना 10 ॲागस्टपर्यंत बदल्या करताना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही हे सांगत आहेत, असेही पाटील म्हणाले.
तिघेही भांडतात, मग परत काहीच झालं नाही, असं सांगतात. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीत, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.