मुंबई: राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सरकार कधी पडणार आहे, अशा अनेंक राजकीय मंडळीकडून बोलण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असे भाकित केले होते. अशातच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट शरद पवार यांनी घेतली आहे. त्याच भेटीच्या दिवशी एक भाकित चर्चेत आलं आहे.
हे पण वाचा: “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र येतील. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचंच द्योतक होतं. मात्र शरद पवारांनी अजित पवारांचं बंड मोडून काढलं. अशात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे नवं भाकित केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे पण वाचा: “राहुल गांधींना मातोश्री, बाळासाहेब आणि शिवसेना जाणून घेण्यात इंटरेस्ट”- संजय राऊत
काय म्हणाल्या आहेत अंजली दमानिया?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येतील यात काहीच शंका नाही. जसं मिलिटरी अॅटॅक करताना रिट्रिट करताना कव्हर फायर देतात तसाच प्रकार आपण नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेच्या रूपाने पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद ही पवार आणि शाह भेटीला कव्हर अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपच्या विरूद्ध आहोत. हे ट्विट करून अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली आहे.
हे पण वाचा: केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…..
राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही
जस मिलिटरी attack / retreat करतांना Cover fire देतात तोच प्रकार आपण आज पहिला
नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार- शाह भेटीला एक cover up करण्यासाठी होता. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजप विरुद्धच आहोत
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 3, 2021
एवढंच नाही तर त्यांनी तीन तारखांचेही संदर्भ दिले आहेत. अंजली दमानिया म्हणतात, १५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात लगेच १६ जुलै फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलै शरद पवार मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही. असंही ट्विट दमानिया यांनी केलं आहे.
Read Also :
- ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका
- वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण नायगाव पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर
- शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का, माजी मंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ठाकरे सरकारच्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेज बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- राज्य किल्ले योजनेत अनेक त्रुटी, संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र