मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच, राजकीय सहकाऱ्यांकडून देखील त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. भाजपचे माजी सहकारी आणि युतीचे भागीदार असलेल्या शिवसेना नेत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, माध्यमांशी बोलताना, ‘नरेंद्र मोदी हे देशातले मोठे नेते आहेत,’ या शब्दांत त्यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया
‘मोदी आता देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या उमेदीचा आणि संघर्षाचा काळ आम्ही अगदी जवळून पाहिला आहे. त्यांच्या कार्यकाळात देशाला राजकीय स्थैर्य आलं. आत्तापर्यंत आघाडीमध्ये राहून सत्तेवर येणाऱ्या भाजपकडे देशाची एकहाती सत्ता आली, ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्यच केलं पाहिजे. त्यांची भूमिका, त्यांचे कार्य कितीही वादविवादास्पद असले, तरी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना, उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा द्यायला हव्यात,’ असं ते म्हणाले.
‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
तसेच, ‘आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस साजरा झाल्यावर ते कोणता केक कापतील हे बघावं लागेल. पण खात्री आहे की देशातल्या महागाई संदर्भातल्या जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे, मोदी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला वाढदिवसाची भेट देतील,’ असाही टोला त्यांनी यानिमित्ताने लगावाला. यावेळी त्यांनी, ‘दादा राजकीय विरोधक असले, तरी सर्वांचे चांगले मित्र आहेत. आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
‘काल ते म्हणाले मला माजी मंत्री म्हणू नका, त्यांची वेदना मी समजू शकतो, पण त्यांना निरोप आहे. पुढची २५ वर्ष तुम्हाला माजीच राहावं लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात हे सरकार किमान २५ वर्षे चालवु. त्यामुळे, २५ वर्ष मनाची तयारी ठेवा,’ असं म्हणत, ‘माझ्या कानावर आले आहे नागालँडचे राज्यपाल म्हणून चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली आहे. म्हणून ते तसं म्हणाले असतील. नागालँडचे राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा,’ असाही खोचक टोला त्यांनी यावेळी मारला.
Read Also :
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी
- आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल
- महापालिकेवर ‘मनसे राज’ आणण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर
- शिवसेनेला पडली मोठी खिंडार: ७ नगरसेवक फोडले, अजून १२ जण पक्ष सोडून जाणार
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी