पुणे : राज्यात कायद्याचं राज्य आहे, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. राज्यात कायद्याचं राज्य आहे तर सरकारने अनिल परब यांना स्वत:हून अटक करावी, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
चंद्रकांत पाटील यांनी तीन ट्विट करून संजय राऊतांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू, असा इशारा पाटील यांनी दिला.
“त्या एका व्यक्तीमुळे भाजप-शिवसेनेचं २५ वर्षाचं नातं बिघडलं,” संजय राऊतांकडून नाव जाहीर
शिवसेना खासदार संजय राऊत हे जनतेतून निवडून येत साधे नगरसेवकही झाले नाहीत, त्यामुळे कोण शहाणं आणि कोण वेडं हे त्यांनी ठरवू नये. तो अधिकार केवळ मतदारांनाच असतो आणि मतदार सुज्ञ आहेत. मतदानाच्या वेळी मतदार आपला अधिकार चोख बजावतील, असा टोला त्यांनी लगावला.
जोर का झटका : नारायण राणे यांना बसला विजेचा शॉक, सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारने आपल्या अखत्यारीत येणारे सर्व प्रश्न सोडवले असून आता अनेक गोष्टी राज्य सरकारच्याच हाती आहेत. त्यामुळे आपल्याच निष्काळजीपणामुळे गेलेले आरक्षण मराठा समाजाला पुन्हा मिळवून देण्यासाठी आतातरी महाविकास आघाडी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, असं आवाहन त्यांनी केलं.
"महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे." असे संजय राऊत म्हणाले होते, त्यामुळे अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू ! 2/3
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 28, 2021
दरम्यान, राऊत यांनी राणेंवर जोरदार हल्ला करताना राज्यात कायद्याचे राज्य असल्याचं म्हटलं होतं. राणे महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारची विधाने करीत आहेत तो केंद्रीय मंत्री म्हणून मर्यादांचा, परंपरांचा भंग आहे व पंतप्रधान मोदी यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे फार मोठे परिणाम भाजपला भोगावे लागतील. महाराष्ट्रातील चार शहाण्यांनी पुढे येऊन राज्यातील पेंढाऱ्यांचे कान उपटावेत, अन्यथा राज्याची घडी विस्कटेल, असा इशाराही राऊतांनी सरतेशेवटी अग्रलेखातून भाजपला दिला आहे.
Read Also :
- महामारी नियमांचं पालन करुन राष्टवादी अध्यक्ष शरद पवार करणार राज्याचा दौरा
- मी न घाबरणारा मराठा! छोटेखानी भाषणात ऍड. उज्ज्वल निकम यांचे उद्गार
- राजनाथ सिंग यांचे महाराजांवरचे ‘ते’ वक्तव्य वादात, कोल्हेंकडून निषेध तर संभाजी ब्रिगेडची माफीची मागणी
- ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
- “…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल