पुणे : आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना सावध राहण्याची गरज आहे. या जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, या जिल्ह्यांचा, राज्यातील एकूण बाधित रुग्णांच्या संख्येत ७०% वाटा आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी व सतर्क राहावे,”
असं आवाहन त्यांनी केलं आहे.
… तर राज्यात लॉकडाऊन अटळ आहे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ दिवस
तसेच, “मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंनी ‘माझा डॉक्टर’ उपक्रमाअंतर्गत डॉक्टरांशी संवाद साधला. त्यानुसार, संभाव्य तिसरी लाट, उपलब्ध असलेल्या व्यवस्थेच्या आधारे थोपवण्याचा आपण प्रयत्न करुया. त्यासाठी लसीकरणावर भर देण्याच्या सूचना केलाय गेल्या आहेत . यामुळे लाटेची दाहकता जाणवणार नाही. कारण लसीकरणाचे सकारात्मक परिणाम पाश्चिमात्य देशांत दिसले आहेत. ऊर्जा मंत्री बोलले असतील, पण आत्ताच्या निर्बंधात वाढ होणार नाही आणि त्याबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील,” असं त्यांनी सांगितलं.
यावेळी, “डॉ. प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स नेमला असून, त्यांनी एसओपी दिलेली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं १००% लसीकरणअत्यावश्यक आहे. तसेच, शाळा व शाळेच्या आसपासचा भाग स्वच्छ आणि सॅनिटाईज करून घ्यावा, विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी असावी, यासंदर्भातील सूचना शालेय शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत. त्यांनी यासंदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून, आता ते पुढचा निर्णय घेतील,” असं ते म्हणाले.
“राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले
“पुण्यात सध्या १२४१३, साताऱ्यात ६३२८, मुंबईत ४२७३, रत्नागिरीमध्ये १०८१ आणि अहमदनगरमध्ये ४९७५ संख्येने सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात कालच्या दिवसात १२५ नवे रुग्ण आढळून आले असून, दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर ११८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त बाधित रुग्णांची संख्या रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात असून, साताऱ्यात सोमवारी ३०८ नव्या बाधित रुग्णांची नोद झाली तर आणि एकाचा मृत्यू झाला,” अशी माहिती त्यांनी दिली.
Read Also :
- अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी – केशव उपाध्ये
- “बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेला थेट आव्हान
- सरकारने विश्वास संपादन करावा, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही- राजू शेट्टी
- राष्ट्रवादीने पाळली पडत्या फळाची आज्ञा, गर्दी होईल असे सर्व राजकीय कार्यक्रम टाळणार
- विधानसभा पराभूत उमेदवारांवर मोठी जबाबदारी? पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक