कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात रोष असल्याने चीनसोबत उद्योग करण्यास अनेक जण तयार नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक दिग्ग्ज कंपन्यांनी चीन सोबत आपले करार रद्द केल्याचे दिसत आहे. त्यापार्शवभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हीच भारतीय उद्योगांसाठी सुवर्ण संधी असल्याचे वक्तव्य केले आहे.
जागतिक आर्थिक परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, जग चीनशी व्यवहार करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक उत्तम संधी आहे. हा एक आहे एक छुपा आशीर्वाद आहे. आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, असे नितीन गडकरी म्हणासकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. “ईझ ऑफ डुइंग बिझिनेसमध्ये वर्ल्ड बँकेने निश्चितच आमची रँक वाढविली आहे, परंतु क्लियरन्स, प्रमाणपत्र आणि अनुपालन प्रक्रिया खूप जटील आहेत. आम्ही सर्व सिस्टम डिजिटल बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. “जीडीपी, कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असेही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरांनी सांगितलं आहेत.
पुढील पाच वर्षांत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)चे उत्पन्न १ लाख कोटी रुपयांवर नेण्याची योजना आहे. एनएचएआयमध्ये सध्या आपण दरवर्षी 28,000 कोटी रुपये कमवतो आणि येत्या पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये घेण्याची माझी योजना आहे. मी सरकारच्या बजेटवर पूर्णपणे अवलंबून नसल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे.