सोलापुर : श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये वारकऱ्यांना भजन किर्तन कऱण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावर वारकऱ्यांनी मंदिर समितीच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे नेते तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं.
“राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर..;” राऊतांचा गंभीर आरोप
आळंदी येथील विनोद जाधव महाराज यांना मंदिरातील विठ्ठल सभा मंडपामध्ये नामजप करण्यास मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर वारकरी आणि मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांमधील वाद निर्माण झाला होता. त्यानंतर माध्यमांंनी आवाज उठवल्यानंतर आज मंदिर समितीने आपल्या निर्णयाचा फेर विचार करत मंदिरातील सभा मंडपामध्ये वारकऱ्यांना नाम जप भजन कीर्तन करण्यास परवानगी दिली आहे.
“ऐन सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली”; सुप्रिया सुळे
त्यानंतर विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती या पदाचा अतिरिक्त कारभार गुरव यांच्याकडून संजीव जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतर तुषार भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे हिंदुत्वाचे सरकार आहे. इथे भक्तांचाच आवाज ऐकला जाईल आणि देव-धर्मावर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई होईल. पांडूरंगाच्या मंदिरातून मुजोर अधिकाऱ्याला हटविण्याची आमची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार असं त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “एकनाथ शिंदेंच्या सभा म्हणजे बाळसाहेबांच्या सभा आहेत की काय असा भास होतो”; उदय सामंत
- वसंत मोरेंचा दिलदारपणा..! स्मशानात मयत घेऊन जाताना आजोबा खडकावर पडले अन्…;
- “भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी सगळेच पक्षातील नेते करताहेत सेनेत प्रवेश”; ठाकरेंचं बळ होतंय दुप्पट तिप्पट
- “ज्यांनी शिक्षणाची दारी खुले केली, ते देखील आपले देव”; भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
- “मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं”; आढळराव पाटलांचं ठाकरेंना तिखट प्रत्युत्तर