मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर शरसंधान साधले. यावेळी त्यांनी आज झालेल्या पावसाळी अधिवेशनपासून, राज्यातल्या महामारीच्या सद्यस्थितीबाबत सगळ्या विषयायांवरून ठाकरे सरकारवर टीका केली. तसेच, महामारीमुळे राज्यात १ लाख ३० हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचं मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही. ते कॅबिनेटला जात नाहीत, पत्रकार परिषद घेत नाहीत, अधिवेशन घेतात तेही दोन दिवसांचं, शरद पवारांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा थेट सवाल करत त्यांनी पवारांवर टीका केली आहे.
भाजप आमदारांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या – तालिका अध्यक्षांचा खळबळजनक आरोप
“लोकसभेचं अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत होणार आहे. पण राज्यातलं अधिवेशन दोनच दिवसांचं घेण्यात आलं आहे. हे अधिवेशन राज्याचं नसून, केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे. राज्यात अनेक जटील प्रश्न आहेत, असं असताना केवळ २ दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकार पळ काढत आहे. परंपरेनुसार अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात. मात्र, हे पळून गेले. एका बाजुला स्वत:ला वाघ म्हणायचं आणि दुसरीकडे कोल्ह्यासारखा पळ काढायचा,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा द्यावा, ठाकरे सरकारकडून विधानसभेत ठराव मंजूर
तसेच, “सरकार वाचवण्यासाठी मुद्दामून १२ आमदारांना निलंबित केलं. मात्र, असं असलं तरी, महाविकास आघाडीतले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवर भाष्य करताना, “त्याच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप करत, “लोणकरच्या मृत्यूनंतर हे सरकार आणखी किती जणांच्या मृत्यूची वाट पाहत आहे,” असा तिखट सवालही त्यांनी केला.
Read Also :
- भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?
- “हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा”, चित्रा वाघ यांचा इशारा
- “लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध”, “हिटलरशाही नही चलेगी”च्या नाऱ्यांनी दणाणला विधानसभेचा परिसर
- “आजची शिवीगाळ, धक्काबुक्की ही फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली झाली”- नवाब मलिक
- भाजपचे आमदार सभागृहात धमकी देत आहेत; नाना पटोलेंचे गंभीर आरोप