जालना : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “नेहरू-गांधी परिवाराला शिव्या घालून तुम्ही सत्तेत आलात. ७ वर्षांत तुम्ही देशाचा काय विकास केलात, हे जनतेला सांगा ना! अजूनही युपीएच सरकार चालवतंय का? तसं असेल तर खुर्ची सोडा, आम्ही डिझेल-पेट्रोलचे भाव कमी करून देऊ!” असा हल्ला केंद्रावर चढवला.
ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!
काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पटोले यांचं बंजारा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांनतर ते बोलत होते. यावेळी, “आजच्या घडीला जे पेट्रोल-डिझेलचे मूळ दर आहेत, ते ३० आणि २२ रु. असताना, हे रस्ते विकासाच्या आणि शेतकऱ्यांच्या नावाने जे तुम्ही ७० रु. कर का लावले आहेत?” असा सवालही त्यांनी यावेळी मोदी सरकारला केला.
भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेने राज्याला ‘हा’ धोका! संजय राऊत यांनी दिला इशारा
तसेच, “रस्ते विकासाच्या नावाखाली पैसा घेऊन, जे रस्ते तयार केले जात आहेत. त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याचे इस्टिमेट १० पटीने वाढवले जात आहेत आणि जनतेच्या पैश्याची लूट करून, भ्रष्टाचार केला जात आहे,” असा आरोप करत; “मोदी सरकारने देशाचे आर्थिक नुकसान करून देशाचा जीडीपी ७.३ % केला आणि देशाला डुबवलं, तसेच केंद्रातलं सरकारही आता पाण्याखाली डुबणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर, “हे अमर, अकबर, अँथनीचं सरकार आपापसातच पाय अडकून पडेल,” अशी टीका केली होती. त्यावर पलटवार करताना पटोले यांनी, “त्यांनी अमर, अकबर, अँथनी चित्रपट पहिला नसावा. हे तिन्ही लोकं अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात लढणारे होते. त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिला आणि म्हणून तो चित्रपट हिट झाला. त्याचप्रमाणे हे सरकारही हिट होणार,” निशाणा लगावला.
टेंडर ऑफलाईन अन् पालिकेची सभा ऑनलाईन का? काँग्रेस नेते आबा बागुलांचा भाजपला रोखठोक सवाल
“ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली. यासाठी महाविकास आघाडी जबाबदार आहे, ” असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना, “फसणवीस सरकार काय होतं, ओबीसी विरोधात कोण आहे, हे लोकांना माहिती आहे, ते किती फसवणार? भाजपत ओबीसी नेत्यांत सुरु असलेलं भांडण सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी समाजाचा मतदानासाठी उपयोग करून घेतला. आंदोलनकर्ते शेतकरी मागास आहेत, त्यांच्यासाठी हे सरकार एक शब्द काढत नाही,” असा हल्लाबोल पटोलेंनी केला.
Read Also :
- देवेंद्रजी, तुमची सात भेटली तर बैलगाडा शर्यत लवकर चालू करु – खासदार डॉ. अमोल कोल्हे
- आठवा महिना लागला तरी स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात – शिवसेना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; १५ कोटींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच
- “आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय?, रुपालीताई तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!”
- “चंद्रकांतदादा, जेवढं तुमचं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द”, रुपाली चाकणकरांचा जोरदार वार