जळगांव : ज्यांना ज्यांना भिती वाटते, त्यांनी सरळ भाजपात जायचं..तिथे सर्व काही माफ होतं, असा टोला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्यातील किंवा आपल्या विरोधातील लोकांना गप्प केलं जात असल्याची टीका सातत्याने भाजपावर केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ईडी, सीबीआय किंवा आयकर विभागाने गेल्या काही दिवसांत राज्यातील नेते आणि सेलिब्रिटींवर केलेल्या कारवाईकडे पाहिलं जात आहे. त्याबाबत आज ओबीसी परिषदेत बोलताना छगन भुजबळ यांनी खोचक शब्दांत तुफान टोलेबाजी केली. परंतू, भुजबळांचा नेमका रोख कुणाकडे होता? याबाबत चर्चांना उधान आले आहे.
५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक
मंत्री छगन भुजबळ यांनी आज जळगाव मध्ये आहेत. जळगावात ओबीसी आरक्षण हक्क परिषद होत आहे. मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज (ता.२५) दिलेत. जळगाव येथे ओबीसा हक्क परिषद घेण्यात आली तेव्हा ते बोलत होते.
मोठी बातमी: ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
ओबीसी समाजात एकता नाही. केंद्राने ओबीसी जनतेची दिशाभूल केली आहे. २००७ ला मिळालेलं obc आरक्षण २०१७ मध्ये हिरावून घेतलं. केंद्राने ओबीसी समाजाचे नुकसान केले. ५० आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय संसदेनं का घेतला नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हात वर करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्रानं इम्पेरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. केंद्रानं हा डाटा दिल्यास सर्वच प्रश्न मार्गी लागतील. पण केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी आहे, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
Read Also :
- कारखानदारांनो, साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल – नितीन गडकरी
- मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार; वैतागलेल्या संभाजीराजेंचा निर्णय
- ज्ञानाची दारं ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला उघडणार; थिएटरचे दर्शन मात्र २४ ऑक्टोंबरला मिळणार
- परीक्षेतील गोंधळाला भ्रष्टाचारी सरकारच जबाबदार; काळ्या यादीतील कंपनीची सीआयडी मार्फत चौकशी करा – भाजप
- साहेब, ३००० रु खर्चकरून आलोयं, माय १५० रु रोजाने कामाला जाते; शेतकऱ्याच्या मुलांशी खेळू नका हो…