मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ दिवसांपासून संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी घेतली आहे. काल आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, एसटीचे कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सरकारसोबत बैठक घेतली होती.
पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ घेण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये नूतन कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १० ते २० वर्षमधील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३५०० रुपयांची वाढ तर ३० ते ४० वर्षांमधील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५०० रुपयांची वाढ केली आहे. यात कर्मचाऱ्यांचा पगार हा १० तारखेला होणार आहे तर यासोबतच कर्मचाऱ्यांना इन्सेन्टिव्ह देखील देण्यात येणार असल्याचीही घोषणा काल करण्यात आली आहे. यानंतर आमदार पडळकर आणि मंत्री सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर जात रात्रभर कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली.
अखेर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; परिवहनमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
आज सकाळी पडळकरांनी आम्ही संपातून बाहेर पडत आहोत अशी घोषणा केली आहे. १० तारखेला जर कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही तर नंतर आम्ही महाराष्ट्रातच आहोत हे मंत्र्यांनी लक्षात घ्यावं. आम्ही कायम कर्मचाऱ्यांच्या सोबत असणार आहोत असं सांगताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. मी निवडणुकीला उभा राहिलेलो असताना माझ्या विरोधात यांनी तीनदा ढुंगण घासून माझा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही माझा अर्ज अबाधित राहिला. आजही आटपाडी प्रकरणी मला जामीन मंजूर करण्यात आला आहे. आंदोलन करतो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न देखील या लोकांकडून झाला आहे असं देखील पडळकरांनी आझाद मैदान सोडताना म्हटलं आहे.
Read Also :
- माजी आमदार विलास लांडे यांचा सल्ला खरा ठरला… भाजपा सत्ताकाळात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीच ‘ठेकेदारी’
- नवाब मलिक यांनी झईदा वानखेडे यांचा मृत्यूचा दाखला ट्विट करत पुन्हा माजवली खळबळ
- मोठी बातमी: आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, सताभाऊ खोत यांची घोषणा
- ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
- रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाला अखेर यश; शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतले ९ निर्णय