मुंबई – गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी “एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगार वाढविण्याचा निर्णय मान्य केला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार आहे. जे कर्मचारी एक ते दहा वर्ष वर्गातील आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली.
राज्य सरकारसोबत चर्चेला जाणाऱ्या पडळकरांना आणि खोत यांच्या शिष्टमंडळाला कर्मचाऱ्यांनी रोखलं
यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने आतापर्यतच्या एसटीच्या इतिहासात इतकी पगारवाढ करण्यात आलेली नाही. वीस वर्ष व त्याहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा पाचशे रुपयांनी वाढविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कमी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता त्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या दहा तारखेच्या आतकरणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
ज्याचं मूळ वेतन १२ हजरा ८० होतं त्यांचं वेतन १७ हजार ८० रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन १७ हजार होतं. त्यांना २४ हजार पगार होणार आहे. ही वाढ ४१ टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. १० ते २० वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४ हजाराने वाढ केली आहे. ज्यांचा पगार १६ हजार होता. त्यांचा पगार २३ हजार ४० झाला आहे. वाढ केल्यानंतर त्यांचा पगार २८ हजार झाला आहे. २० वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन हजाराने वाढ केली आहे, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत
दरम्यान, राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. त्यांच्याकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची एकच मागणी होती कि विलीनीकरण करण्यात यावे. उच्च न्यायालयात हा विषय गेला त्यावेळी न्यायालयाने त्रिसदसिय समिती नेमली. तिने बारा आठवड्यामध्ये निर्णय घ्यावा असे सांगितले. समितीचा अहवाल यायला अजून बराचवेळ आहे. याबाबत आमदार पडळकर, सदाभाऊ खोत, उच्चं तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी बैठक घेत चर्चा केली. त्यामध्ये अंतरिम पगारवाढीचा मुद्दा शिष्टमंडळाकडून उपस्थित करण्यात आला. त्यानंतर या प्रस्तावा बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली त्यांनी पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून प्रस्तावबाबत काही मुद्दे –
1. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून प्रस्ताव
2. किमान 5000 ते कमाल 21 हजारापर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव
3. कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्त वाढ करमार
4. एसटी कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला वेळेत पगार मिळण्याची खबरदारी
5. प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेला पगार होण्याची खबरदारी घेणार
6. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन 50 हजाराहून जास्त असल्याल त्यांना कमी वेतनवाढ
Read Also :
- नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
- आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
- पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
- रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा