मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल येण्याच्या अगोदर दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला जात आहे. तर राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचं दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. यातच आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्ठाळू नेते होते” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापटांना भावपूर्ण श्रध्दांजली
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगलं सरकार आहे. ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आताचं सरकार मार्गी लावत आहे. शिवसेना आमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची साथ सोडली, यासाठी आम्ही जबाबदार नाही. काही मोजके खासदार सोडले तर त्यांचे सर्व खासदार आमच्यासोबत आहेत. असं पियुष गोयल यांनी म्हटलंय.
हेही वाचा…चिंता नसावी..! संजय राऊतांनी सोनिया गांधी अन् राहुल गांधींची घेतली भेट
दरम्यान, उद्धव ठाकरे गटातील आणखी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती मला मिळाली आहे. विधीमंडळात तर हम दो हमारे दो असेच राहतील. फक्त आडनाव वापरून चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही. मेरिटनुसारच देश प्रगती करेल. असंही त्यांनी सांगितलंय.
Read also
हेही वाचा… संजय राऊतांना कोर्टाचा मोठा दणका, ‘इतक्या’ रूपयांचा ठोठवला दंड
हेही वाचा…“आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून, आरोग्यमंत्री स्वत:चीच पाठ थोपटण्यात व्यस्त”
हेही वाचा…“आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, भाजपला संशय, मनसुख हिरेन २.० असल्याचा दावा”
हेही वाचा…“साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं”, गिरीश बापटांच्या निधाननंतर चंद्रकांत पाटील भावूक
हेही वाचा…“मंत्रीपद अन् पालकमंत्रीपदावरून तानाजी सावंत नाराज, शिंदे गटात आलबेल नाही”?