मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ३०० भारतीयांची केंद्र सरकारने जासूसी केल्याचा आरोप, विरोधकांनी मोदी सरकारवर केला असून, हॅकिंगद्वारे या सर्वांवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ३०० मध्ये ४० पेक्षा जास्त पेशाने पत्रकार असून, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा
दरम्यान, भाजप नेत्यांकडून या आरोपांचे खंडण केले जात असून, आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आरोपांचं खंडण केलं आहे. “संसदेचं अधिवेशन, रणनीती करून आणि खोट्या बातम्या पेरून डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. अधिवेशनाच्या कामात अडथळे आणले जात आहेत. याआधीच सरकारने, आपली कोणतीही एजन्सी नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, हे जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.
Opposition doesn't want Parliament to run smoothly. Pegasus project is conspiracy to ruin the nation. Telegraph Act is strong under PM Modi's govt. It has cleared that legal interception is done & illegal hacking doesn't take place: Devendra Fadnavis, LoP in Maharashtra Assembly pic.twitter.com/umZz5ti7Ae
— ANI (@ANI) July 20, 2021
धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
तसेच, ‘पेगॅसस प्रोजेक्ट’ मध्ये ४५ देशांचा उल्लेख आहे. पण मुद्दामून चर्चा फक्त भारताची केली जात आहे. भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा कट आहे. दरम्यानच्या काळात काही माध्यमांना थेट चीनकडून पैसे पुरवले जात होते आणि ती माध्यमे भारतविरोधी प्रचार करत होती. आपल्या ‘टेलिग्राफ’ कायद्याच्या तरतुदीनुसार, ज्याला जी माहिती हवीये ती त्याला मिळू शकते. त्यामुळे, केंद्र सरकारला असं काही करण्याची गरजंच नाही,” असा दावा त्यांनी केला आहे.
Shri Devendra Fadnavis interacting with media at Mumbai on pegasus issue https://t.co/Z29c9blx3F
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 20, 2021
का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
यावेळी, याआधीच्या युपीए सरकारच्या काळात झालेल्या प्रकारणांबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. “ममता बॅनर्जी यांनी तत्कालीन प.बंगाल सरकारवर फोन, इमेल, एसएमएस टॅपिंगचे आरोप केले होते. प्रणव मुखर्जींनीही असे आरोप केले होते. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारच्या या कृतीचं समर्थन करत, यासंदर्भात जेपीसी करण्याची कोणतीही गरज नसून, कायदेशीररीत्याच सगळं झालं असल्याचं संसदेला सांगितलं होतं. तसेच, देशातल्या आघाडीच्या उद्योगपतींचे फोन राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार याकरता हे टॅप केले जात आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली होती, असं त्यांनी सांगितलं.
काय आहे ‘पेगॅसस’? सामान्यांसाठी उपलब्ध आहे का?
हे सॉफ्टवेअर फक्त सरकार किंवा सरकारी संस्थानाच वापर करण्यासाठी कंपनी विकते. सामान्य नागरिकांना ते वापरण्यासाठी उपलब्ध नाही.
कसं काम करतं ‘पेगासस’?
ज्या व्यक्तीच्या फोनला हॅक करायचं आहे. त्या व्यक्तीच्या फोनमध्ये ‘पेगासस’ इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. यात जास्त करून, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. आणि जसं त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, सॉफ्टवेअर आपोआप इन्स्टॉल होतं.
व्हॉटस अपमध्येही इन्स्टॉल होतं?
हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन २०१९ मध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होत. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक बग शोधून काढून, त्याच्या आधारे नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. आणि एका कोडद्वारे या सॉफ्टवेअरला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.
पेगासस नेमकी कोणती माहिती चोरतं?
पेगासस इन्स्टॉल केल्यावर हॅकर्स, तुमच्या फोनला कमांड देऊन, फोनचं नियंत्रण मिळवतात आणि हवी ती माहिती मिळवतात. यात अनेक खाजगी गोष्टी असू शकतात. जसे की पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज इ. तसेच, ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात, फोनचा कॅमेरा, माईक वाटेल तेव्हा चालू करु शकतात.
पेगासस एवढं फेमस का आहे?
- कमी बँडविथवर काम करु शकतो. फोनची बॅटरी खात नाही. मेमरी, त्यातला डेटा संपवत नाही, त्यामुळे विनासंशय फोन हॅक होतो.
- अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त सुरक्षित. iOS लाही हॅक करु शकतो.
- फोन लॉकचा फरक पडत नाही.
Read Also :
- पटोलेंमुळे महाविकास आघाडीत मतभेद, तर काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य? काँग्रेस नेत्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट
- संसदीय समितीच्या बैठकीत मोदींनी उठवले, काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह, म्हणाले…
- मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं; अदानींचा मोठा निर्णय
- भाजप-राष्ट्रवादीच्या दोन युवा नेत्यांमध्ये जुंपली, फडणवीसांवरच्या टीकेला दिले ‘गावरान तुपाने’ प्रत्युत्तर
- आरक्षण मिळवून न देण्यामागे ‘या’ नेत्यांचा हात, भाजपने उघड केली झारीतील शुक्राचार्यांची नावे