मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला जी गर्दी होते, ती गर्दी स्वर्गीय बाळासाहेबांच्या सभेसारखी असते. म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो, कारण एवढी लाखो लोकांची गर्दी सभांना होत आहे, असं म्हणत कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना बाळासाहेबांशी करून टाकली. त्यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार त्या पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“ऐन सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली”; सुप्रिया सुळे
एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. अतिशय वेगाने ते काम करतात. 22 तारखेला आमची बैठक घेतली आणि 28 तारखेला भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील पंडीत दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटी रूपये मंजूर केले. अडीच वर्षापूर्वी जी संकल्पना आमच्यासमोर आली, ती संकल्पना एकनाथ शिंदे यांनी केवळ अडीच महिन्यात प्रत्यक्षात उतरवली, म्हणूनच बुलेट ट्रेनपेक्षाही त्यांचा फास्ट स्पीड आहे, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.
“बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका”; चंद्रकांत खैरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
दरम्यान, अडीच वर्षात जे जमलं नाही, ते अडीच महिन्यात झालं. 20 दिवसांपुर्वी आमची बैठक झाली होती. मागच्या सरकारमध्ये केवळ फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जात होती. मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही सुद्धा शिव्यांची पीएचडी केली आहे. आम्ही केवळ शिंदेंना पाठिंबा दिला म्हणून गद्दार का ? एकही रूपया मी घेतला असेल तर दाखवून द्या. मी राजकीय सन्यांस घेतो असं आवाहन देखील उदय सामंत यांनी केलं आहे.
Read also
- वसंत मोरेंचा दिलदारपणा..! स्मशानात मयत घेऊन जाताना आजोबा खडकावर पडले अन्…;
- “भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी सगळेच पक्षातील नेते करताहेत सेनेत प्रवेश”; ठाकरेंचं बळ होतंय दुप्पट तिप्पट
- “ज्यांनी शिक्षणाची दारी खुले केली, ते देखील आपले देव”; भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
- “मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं”; आढळराव पाटलांचं ठाकरेंना तिखट प्रत्युत्तर
- “राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर..;” राऊतांचा गंभीर आरोप