शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज (26 जुलै) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आणि अनेक राजकीय गोष्टींचा खुलासा केला
महाविकास आघाडींच सरकार स्थापन करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शरद पवारांच मार्गदर्शन हे मोलाचं ठरलंय. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग आहे. या काळात शरद पवारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे मार्गदर्शन मिळतं हे त्यांनी स्वतः सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ‘त्यांच्या सोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो. ते भेटतात तेव्हा काही कामं घेऊन येतात असं अजिबात नाही. कधी कधी त्यांचा फोन येतो की, उद्या काय करताय? आणि बहुतेक वेळा मग सगळं जुळत असेल तर त्यांची आणि माझी भेट होते. भेटीत ते त्यांचे जुने अनुभव सांगत असतात. लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केलं होतं…चीनचा विषय निघाला. संरक्षणमंत्री असतानाचे त्यांचे अनुभव…त्यांचा चीन दौरा…मग चीनच्या पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली… जुन्या त्यांच्या अनुभवांच्या आठवणी ते सांगत असतात.’ अस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.